इंदापुर (गौतम जाधव) भारत देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये कोरोना या झालेल्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व सर्वञ लाँकडाऊन असल्याने गोर गरीब सर्वसामान्य नागरिकांची अन्नधान्य तसेच आर्थिक परिस्थिती ही मोठ्या प्रमाणात धोक्यात आली असून या परिस्थितीचा फायदा घेऊन अत्यावश्यक सेवेत येणारे इंदापुरमधील काही किराणा मालाचे दुकानदार हे कडधान्ये डाळी, तांदूळ तसेच (सिमेंट )व इतर वस्तुचे भाव स्वतःच्या मनाने वाढवून सर्व सामान्य गोरगरीब जनतेची हे किराणा दुकानदार मोठ्या प्रमाणात फसवणूक करत असल्याचे सुबोध जाधव अध्यक्ष माणगांव तालुका म.न.से यांनी प्रतिनिधीजवळ बोलताना सांगीतले.
तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले की इंदापुरमधील किराणा मालाचे काही दुकानदार हे अत्यावश्यक सेवेत येत असून काही किराणा दुकानदार देखील परवाना नसताना ते लाँकडाऊनचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या गोडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात लाखोंचा धान्याचा साठा करून ठेवला असून हे काही दुकानदार प्रत्येक वस्तुंची पाच, दहा, विस, पन्नास आशा रूपयांची वाढ करून ते बिधास्तपणे शासनाच्या डोळ्यांत धूळ फेक करून सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः लूटत असल्याच्या तक्रारी या म.न.से कार्यालयात काही नागरिकांनी केल्या असून काही दुकानदार तर सोशल डिस्टन्ससींगचे नियम सुध्दा धाब्यावर बसवत आहेत.
इंदापुरमध्ये सर्वसामान्य नागरिकांनाची होत असलेली लूट थांबविण्यासाठी माणगांवच्या प्रांत अधिकारी दिघावकर तसेच माणगांव तहसिलदार आयरे मॅडम यांची भेट घेऊन या किराणा दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यास सांगणार आहोत तसेच सर्वसामान्य गोरगरीब नागरीकानी इंदापुरमधील कुठल्याही किराणा मालाच्या दुकानातुन कुठल्याही वस्तू मालाची खरेदी केली तर त्यांनी त्या सामानाचे दुकानदाराकडून बील हे लेखी स्वरूपात सही सींक्का मारू घ्यावे असे देखील सर्व सामान्य जनतेला आव्हान देखील सुबोध जाधव यांनी केले आहे.