458 Views
मुरुड जंजिरा (नरेश हिरवे) गेले दोन दिवस ढगाळ वातावरणानंतर आज पहाटे पासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील जनजीवन विस्कळित झाले असून बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अांबा पिकांवर, वाल पेरणीवर आदी फळभाज्यांवर व सुपारी बागायत यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाले असून येथील शेतकरी व बागायतदारांना खूप वाईट परिस्थितीला तोंड देऊन जगावे लागत आहे.
आदीच कोरोनासारख्या भल्यामोठ्या संकटाला तोंड देत असताना त्यात निसर्ग चक्रीवादळ आणि आता हा अवकाळी पाऊस या सर्व कठीण परिस्थितीला तोंड देत जगावेतरी कसे असा प्रश्न बळीराजा समोर आ वासून उभा आहे.